गोंड परंपरा आणि शैव धर्माची निर्मिती श्रीधर तिळवे नाईक 


भारतामधील आदिवासी परंपरा अजूनही सर्वात प्राचीन असलेल्या शैव-धर्माच्या अनेक आठवणी जपून आहेत प्रत्येक आदिवासी परंपरेची स्वतःची म्हणून कथा आहे ती समजून घेणे अत्यंत अवघड जाते याचे कारण असे अनेक शब्द आहेत जे आता आपणाला कळतच नाही अनेक शब्द असे आहेत उदाहरणार्थ मेंदू हे आदिवासी लोकांनी दिलेले आहेत परंतु आपणाला ते आदिवासी आहेत हे सुद्धा माहित नाही 


भारतातील गोंड परंपरा मात्र अत्यंत सशक्तपणे शैव-श्रुतीच्या घटना अजूनही सांगते आहे आदिवासी लोकांच्यात आजही राजा हा शंभू मानला जातो आणि ते शंकराला शंभूच म्हणतात पहिला शंभू कधी झाला याविषयी एक अंदाज वर्तवता येतो आणि तो साधारणपणे इसवी सन पूर्व 11000 च्या आसपास असावा याचे कारण असे की गोंड परंपरेमध्ये शैव धर्माची किंवा शंभू धर्माची स्थापना ही 49 व्या शंभूच्या (४९ वा संभु म दाऊ)कारकीर्दीमध्ये झालेली आहे त्या आधीचे 48 शंभू हे नेमके कोण होते याचाही एक अंदाज या परंपरेमध्ये आहे मात्र निश्चित वर्णनांचा अभाव आहे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे शंभू किंवा शंभू ही एक शतकण शतके चाललेली परंपरा होती आणि साधारणपणे इसवी सन पूर्व आठ हजार ला शैव श्रुतीला गोंड समाजामध्ये धर्माचे स्वरूप देण्यात आले ह्या शंभूचे कार्यालय पंचमढी होते हे निर्विवादपणे मानले जाते रुपो लंग पहांदी पारी कुपार लिंगो यानेच कोया पुनेम म्हणजे म्हणजे सत्याकडे नेणारा मार्ग स्थापन केला इतकेच नव्हे तर त्याने 33 शिष्य तयार केले काही ठिकाणी हे 33 शिष्य अनाथ होते असेही मानले जाते प्रत्यक्षामध्ये मला स्वतःला ही शक्यता वाटत नाही याचे कारण आदिवासी लोकांच्या मध्ये सहसा कोणी अनाथ असत नाही मात्र काही गोंड परंपरेमध्ये ते अनाथ होते असे सांगितले जाते शंभू ने या 33 लोकांना 33 नगर बांधून दिले आणि त्यांना या 33 नगरांचे अधिपती बनवले आणि यामध्ये लिंगोचा प्रचंड वाटा होता किंबहुना मार्गदर्शकाचे काम त्याने केलेले आहे किंबहुना लिंगो या शब्दाचा अर्थ लिंगाविषयी मार्गदर्शन करणारा असा होतो भारतातले सर्व आदिम नगरे ही या 49 व्या संभूने बसवलेली होती आद्य नगर ज्याला आज आपण काशी म्हणतो ते पहिल्या शंकराने वसवले होते त्याच्याच ढाच्याच्या आधारावर ही 33 नगरे वसवली गेली होती त्या काळामध्ये मेटलचा म्हणजे धातूचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे लाकूड आणि दगड हाच आधार होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच दगडावर दगड ठेवत बांधकाम करण्याची विशिष्ट कला भारतामध्ये आदिवासी लोकांनी विकसित केली होती जी 1850 पर्यंत वडारी लोकांनी शाबूत ठेवली होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि शंकराची अनेक मंदिरे ही अशी दगडावर दगड ठेवत विकसित केली गेलेली आहेत किंवा मग मोठ्याच्या मोठा दगड हा कोरून काढून त्याचे मंदिर बनवलेले आहे उदाहरणार्थ कैलास मंदिर ही शैव आदिवासी परंपरा आहे या नगरांच्या मध्ये सगेसोयरे यांनी बनलेले सग वसवले गेले आजही "सगेसोयरे" हा शब्द मराठीत प्रचलित आहे आणि त्याचबरोबर सगळे असाही शब्द आहे त्यांची उत्पत्ती आदिवासी परंपरेत आहे माझ्या कवितेमध्ये मी अनेकदा सगळे हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो त्याला कारण ही आदिवासी परंपरा आहे जे करायचे ते सगळ्यांसाठी जे करायचे ते सगळ्यांनी अशी ही परंपरा आहे शंकराने निर्माण केलेले गण नंतर कसे स्वायत्त होत गेले त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोंड गण होय हा सर्वात मोठा गण होता आणि बहुदा पहिला शंकर हा याच गणातून आलेला असावा शंकराच्या आयुष्यासंदर्भामध्ये जेवढे तपशील या गणामध्ये आपणाला दिसतात तेवढे ते दुसऱ्या समाजांच्या मध्ये दिसत नाहीत महाराष्ट्रातल्या पैशाची गणामध्ये असे तपशील मिळतात कारण याच भाषेमध्ये बृहद कथा सरित्सा सागर निर्माण झाले महाराष्ट्राची शैव परंपरा त्यामध्ये तपशीलवार नोंदवलेली आहे मात्र त्याआधीच्या सर्व गोष्टी या आदिवासी परंपरांच्या मध्येच दिसतात तिथे संभू हा शब्द जास्त येतो कारण तो राजाचा निर्देशक आहे आणि शंकर हा पहिला शंभू आहे मराठ्यांच्या भाषेमध्ये पहिला संभाजी आहे 


शंकराने प्रथम जंबुद्वीप पाच खंडात विभागला आणि उत्तर वायव्य हा भाग स्वतःकडे ठेवून पूर्व ईशान्य भाग पार्वतीला जो पूर्वेला होता एक भाग पश्चिमेला जो गणपती आणि परशुराम यांच्याकडे होता एक भाग दक्षिणेकडे ज्यात महाराष्ट्र सुद्धा येतो जो स्कंधाकडे मराठी भाषेत खंडोबा कडे सोपवला गेला आणि मध्यभाग ज्यात आत्ताचे बिहार सुद्धा येते हा नंदीकडे सोपवला गेला शंकराने उत्तर आणि वायव्य हे दोन्ही भाग आपल्याकडे ठेवले कैलास आणि थेट बांगला उपसागर पर्यंतचा भाग हा पार्वतीकडे आला आणि म्हणूनच तिथे आज सुद्धा दुर्गा उत्सव प्रचंड प्रमाणामध्ये साजरा केला जातो पश्चिम भाग गणपती कडे आला आणि म्हणूनच गणपती उत्सव येथे सर्वात जास्त साजरा होतो तर दक्षिण हा स्कंधाकडे गेल्याने तिथे अय्यप्पा वगैरे स्कंद रूपांचे उत्सव सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात साजरे होतात मध्यभागामध्ये नंदीचे उत्सव एकेकाळी फार मोठ्या प्रमाणात होत अलीकडे खुद्द आदिवासी लोकांना त्याचा विसर पडलेला आहे मात्र बैल हे आदरणीय बनण्याचे सर्वात मोठे कारण ते नंदीचे कुलचिन्ह होते 


गोंडशैव धर्मामध्ये सुद्धा पंचखंड महत्त्वाचे झाले आणि तिथे सुद्धा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्य असे पाच खंड आपणाला दिसतात खंड म्हणजे भूप्रदेश होय त्यातून येणाऱ्या उत्पन्नाला खंडणी म्हटले जाते आणि आजही हा शब्द प्रचलित आहे जो खंड वसूल करतो आणि नंतर व्यवस्थित वाटून देतो त्याला खंडोबा म्हणतात पान सुपारी हे शिवलिंगाचे प्रतीक आहे त्यातील सुपारीला सुद्धा खांड म्हटले जाते धार असलेल्या पात्याला सुद्धा त्यामुळेच खांडवी किंवा खांडोळी म्हटले जाते किंवा तुझ्या देहाची मी खांडोळी करेन म्हणजे तुकडे तुकडे करेन असे म्हटले जाते तेही यातूनच आलेले आहे महाराष्ट्रात आपण दसरा किंवा विजयादशमी साजरा करत नाही तर खंडे नवमी त्यामुळे साजरी करतो पान म्हणजे शक्ती लिंग आणि सुपारी म्हणजे शिवलिंग होय आणि म्हणूनच सर्व शैव लोकांच्या प्रत्येक विधीमध्ये किंवा संस्कारामध्ये किंवा प्रत्येक उत्सवामध्ये पान सुपारी दिली जाते घेतली जाते एकदा पान सुपारी दिली की तुम्ही ते वचन पाळायलाच हवे अशी सक्ती आहे कारण तुम्ही साक्षात शिवलिंगाची देवाण-घेवाण केलेली आहे आणि शिव आणि शक्ती यांना साक्षी ठेवलेले आहे असा त्याचा अर्थ असतो (अगदी अंडरवर्ल्डमधले लोक सुद्धा सुपारी घेतली की तोडता येत नाही असे म्हणतात त्याचे कारण यातच आहे)


गोंड परंपरेनुसार पंचखंड धरतीचा मध्यभाग पेंकमेढी कोर गण चिन्ह हरण (हरण निवडण्याचे कारण ते सूर्याचा अंश स्वतःत बाळगते ही या काळातली समजूत होय या काळामध्ये सूर्याला सर्वात मोठे व प्रभावी महालिंग मानले जात होते ) , पूर्व भाग सयमाल गुट्टाकोर गण चिन्ह वाघ (याचा थेट संबंध बेंगाल टायगर शी आहे), पश्चिम भाग येरगुट्टाकोर गण चिन्ह गेंडा( या काळात महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये अपवादात्मक वेळेला सिंध आणि राजस्थानमध्ये गेंडे प्रचंड प्रमाणात होते ) , उत्तर भाग उम्मोगुट्टाकोर गण चिन्ह म्हैस उत्तर (ह्या काळामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेली उत्तर जितकी सुरक्षित आता वाटते तितकी नव्हती हे लक्षात घेतले पाहिजे मुख्य म्हणजे गंगा आणि यमुनेला येणारा पूर प्रचंड असायचा आणि या पुरामध्ये दलदलीमध्ये राहण्याची आणि टिकण्याची सर्वाधिक क्षमता ही म्हशींच्याकडे होती त्यातूनच पुढे महिषासुरमर्दिनी ही संकल्पना डेव्हलप झालेली आहे) आणि दक्षिणी भाग अयफोगुट्टाकोर गण चिन्ह हत्ती( या काळामध्ये कर्नाटक आणि केरळ मध्ये असलेले हत्ती प्रचंड संख्येने होते हे सांगण्याची गरज सुद्धा नाही) असे होते काही परंपरानुसार प्रत्यक्षामध्ये गोंड लोकांनी या काळामध्ये संपूर्ण भारत जिंकला होता आणि या काळामध्ये त्यांचे मुख्य गण चिन्ह हत्ती म्हणजेच नाग होते नाग या शब्दाचा अर्थ नंतर बदलला असला तरी प्रत्यक्षात मूळचा अर्थ नाग म्हणजे हत्ती असा आहे म्हणूनच प्रत्येक गणाचा अधिपती म्हणजेच गणपती हत्तीवर बसतो सर्वच मंदिरांच्यावर विशेषतः शैव मंदिरांच्यावर आपणाला हत्ती अनेकदा कोरलेला दिसतो कारण तो गणाच्या एकीकरणाचे ,समृद्धीचे, शहाणपणाचे आणि बळाचे प्रतीक आहे गोंडवनातील लोकांचा हत्ती हाच या काळामध्ये गण चिन्ह बनत गेलेला दिसतो जिला आज आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो तिचा बराचसा मध्यभाग हा गोंड संस्कृतीने व्यापला होता विदर्भ आणि मध्यप्रदेशात यासंदर्भात अधिक उत्खनन होणे आवश्यक आहे हत्ती म्हणजेच नाग म्हणूनच या संस्कृतीला नाग संस्कृती म्हणून सुद्धा नंतर ओळखले जाऊ लागले आणि या नाग संस्कृतीवर प्रचंड प्रभाव हा शैव धर्माचा होता पुढे नाग या शब्दाचा अर्थ कोब्रा असा झाला आणि शंकराच्या मूर्तीच्या गळ्यात नाग म्हणून कोबरा आला प्रत्यक्षामध्ये हा साप कुंडलिनीचे प्रतीक आहे म्हणून तो पाठीच्या कण्यात दाखवला गेला पाहिजे तो गळ्यात आला याचे कारण मूर्ती पूजेत अनेकदा मूर्तीला सोयीस्कर असे बदल मूर्तिकार करतात 


या गोंड परंपरेतच जेव्हा गोंडशैव धर्माची स्थापना झाली तेव्हा अनेक नियम विशेषत: सामाजिक नियम अस्तित्वात आले त्यातील एक नियम म्हणजे विवाह हा स्वतःच्या सगामध्ये न करता दुसऱ्या सगामध्येच करणे खरे तर याची सुरुवात सुद्धा शंकराने केली होती त्याने चक्क दुसऱ्या देवगणामधील पार्वतीला विवाह करून आणले होते देवगण हा या काळामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहत होता इतकेच नव्हे तर स्वतःच्या सगांमधील माणसाची हत्या करायला पूर्णपणे मनाई करण्यात आली सगेसंबंधी हा शब्द मुळातच सगामधले संबंधित लोक या अर्थाने प्रचलित आहे 


या पाचही भागांचा कंट्रोल किंवा नियंत्रण हे मध्यभागाकडे होते साहजिकच तो सर्वाधिक महत्त्वाचा होता जर का गोंड संपूर्ण भारतभर पसरले होते असा जर का त्याचा अर्थ असेल तर आपणाला हा कंट्रोल किंवा नियंत्रण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाकडे असावे असे मानायला जागा आहे 


आद्य धर्म म्हणून आणखी एका धर्माचा उदय या काळामध्ये झालेला आहे 


या दोन आद्य धर्मांच्या फाउंडेशन स्टोननीच ज्याला आज धर्म म्हटले जाते त्याचा पाया घातला मात्र मूळ शंकरांच्या उपदेशामध्ये धर्म हा अक्ष नव्हता हे आपण आधीच पाहिले आहे किंबहुना शैव लोकांच्यात सुद्धा या काळात धर्माला धर्म असा शब्द नव्हता तर चांगले आचरण सुअचरण अशाच अर्थाने शब्द प्रचलित होते जसे गोंड गणामध्ये धर्माला कोया पूनेम हा शब्द आहे चांगले आचरण करणे हा त्याचा सैद्धांतिक पाया आहे एका अर्थाने भारतानेच आणि मुख्य म्हणजे शैव श्रुतीनीच सर्वात पहिला धर्म किंवा सर्वात पहिले धर्म दिलेले आहेत आणि त्यांच्या आधारानेच पुढचे अनेक धर्म आणि धम्म निर्माण झालेले आहेत 


भारताचा इतिहास हा आदिवासी लोकांना वगळून लिहिण्याची धार्मिक परंपरा आहे पण मला असे वाटते की तो काळ संपला आणि संपला नसेल तर आता शैव विचारवंतांनी व लोकांनी तो संपवावा 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे