मी फक्त प्रणव सखदेव यांच्या कादंबरीवर का बोललो ? श्रीधर तिळवे नाईक
माझे साहित्यिक कार्यक्रमांच्या बाबतीत नेमके काय चालते याबद्दल अनेकांचां गोंधळ उडालेला दिसतो आणि काहींचा गैरसमज ही झालेला आहे म्हणून हे लिहीत आहे.
हे खरे आहे की मी साहित्यिक कार्यक्रम खूपच कमी घेतो कारण अनेक क्षेत्रांमध्ये माझे काम चाललेले असते . मात्र जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी कधीही नाही म्हणत नाही . अनेक फालतू कार्यक्रम मात्र मी नाकारतो कारण असा एक कार्यक्रम करून काय होते ते मी पाहिले आहे केवळ मंगेश आणि भुजंग मेश्राम यांच्या आग्रहास्तव मी तसा कार्यक्रम घेतला होता आणि ज्याचा हा कार्यक्रम घेतला त्याची कविता अतिशय सामान्य होती. हेमंत दिवटे यांच्या थांबताच येत नाही या कवितासंग्रहावर मी बोलण्याचे सर्वात मोठे कारण सलील वाघचा आग्रह होता अन्यथा परिसंवादात सहसा बोलू नये असाच माझा एक नियम आहे . अपवाद सर्वच ठिकाणी असतो आणि तो नेहमी मैत्री असतो
कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सर्वसाधारणपणे आचार्य हे नेहमी एकटे बोलतात सुरुवातीला कोणीतरी ओळख करून देते आणि आचार्यांचे भाषण झाल्यानंतर कुणीतरी कार्यक्रम समाप्तीची घोषणा करण्यासाठी बोलतो त्यात जे काही बोलले गेले त्याचे सार तत्व सांगितले जाते
ही एक व्यवस्था आहे आणि ती हजारो वर्षे सुरू आहे . साहित्यिकांची अपेक्षा अशी असते की मी त्यांची मेथड फॉलो करावी आणि मला ते शक्य नसते . याचा अर्थ असा नाही की मी प्रयत्न केला नाही परंतु अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या व्यक्तिमत्त्वात फीट बसत नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे
साहजिकच जेव्हा साहित्यिक कार्यक्रम माझ्याकडे चालून येतात तेव्हा मी ही माझी पद्धत सांगतो साहित्यिक कार्यक्रम या पद्धतीत बसतच नसल्याने साहजिकच पुढे काहीही पावले पडत नाहीत मी ही कधी पाठपुरावा करत नाही कारण कुठल्याही क्षेत्राची स्वतःची एक सिस्टीम असते या सिस्टीम मध्ये तुम्ही त्या सिस्टीमबाहेरचा माणूस बोलवत असाल तर एक तर त्या माणसाने त्या सिस्टीमशी अड्जस्ट करणे गरजेचे असते किंवा मग सिस्टीमला त्या माणसाशी अड्जस्ट करावे लागते प्रणव सखदेव यांच्या कादंबरीवर मी बोललो कारण तो या आचार्य सिस्टीमशी ऍडजस्ट करायला तयार होता. त्यानंतर कुठलेही आमंत्रण अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट करायला तयार नव्हते त्यामुळे साहजिकच कोणालाच होकार देता येणे शक्य झालेले नाही हीच गोष्ट काव्यवाचन संदर्भात ठरवली आहे मुंबई विद्यापीठात माझे पहिले काव्यवाचन केशव मेश्राम यांनी ठेवले होते आणि ते चौथ्या नवतेच्या कविता नवीन पिढीला कळावे म्हणून ठेवले होते आणि ते सोलो होते . नंतर ही शिवाजी विद्यापीठात मराठी विभागातर्फे रणधीर शिंदे यांनी ऑफर दिली होती आणि जवळजवळ ठरलीही होते पण माझ्या आरोग्याच्या तक्रारीने सर्व काही अशक्य होत गेले चौघांच्या कवितेबाबत गोष्टी अशक्य बनत गेल्या आणि त्या का अशक्य बनल्या याची कारणे इतर तीन कवींना माहिती असावीत . अर्थातच मी आता मात्र त्यांच्यामधून अंग काढून घेतो आहे. यामुळे काय होणार याची मला कल्पना आहे आणि होती
माझी याबद्दल कसलीही यापूर्वीही तक्रार नव्हती आणि पुढेही नसणार. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या जागी चुकतो आहे .
चित्रपट ही गोष्ट या गोष्टीला अपवाद आहे कारण ती माझ्यासाठी कला कमी आणि व्यवसाय जास्त आहे . तिथे मी समीक्षक म्हणून काम करू इच्छित नाही. माझ्या अभिनयाच्या क्लासमध्ये मात्र मी एकटाच असतो आणि मी आचार्य म्हणूनच शिकवतो .
खरे तर यावरही मी फार काही जाहीर बोलत नव्हतो परंतु अलीकडे आमंत्रण जास्त यायला लागलेली आहेत म्हणून हे बोलतो आहे उगाच प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण देत बसणे यापेक्षा एखादे स्पष्टीकरण जाहीर केले की मग वाया जाणारी आमंत्रणे कमी होतील इतर लोकांचा वेळ वाचेल अशी अपेक्षा आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment