व्यवहार वाद ,उत्तर व्यवहारवाद, हिंदुत्ववादी वर्तनाचा प्रत्यक्ष व्यवहार अर्थात सावरकर वादी हिंदुत्ववादाच्या व्यवहाराची चौकट आणि त्यांना मिळणारे यश उदाहरणार्थ मंगेशकर परिवार ते श्री श्याम पोंक्षे श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये एका विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणाऱ्या सावरकर केंद्री लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या तुम्हाला पदोपदी भेटत असते तिचे वागणे अतिशय सभ्य असते बोलण्यातले उच्चार अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असतात आणि सादरीकरण हे विसाव्या शतकाला आणि एकविसाव्या शतकाला साजेसे असते. साहजिकच तुम्ही या लोकांच्या प्रेमात पडता. वैयक्तिक पातळीवर तुमच्याशी यांचे संबंध कायमच मधुर राहतात .ते तुम्हाला वापरत राहिले तरीसुद्धा तुम्हाला धन्यता वाटत राहते आणि अचानक एखाद्या आणीबाणीच्या क्षणी तुम्हाला कळून चुकते की आवश्यक ती मदत आलेली नाही फक्त शब्दाचा फुलोरा आलेला आहे तेव्हा मग तुम्ही थोडेसे सटपटता बोलाचीच कढी बोलाचाच भात असा हा प्रकार असतो अपवादात्मक वेळेला कधीतरी अचानक पणे मदत केली जाते पण ही मदत अनेकदा हे लोक एकमेकांना आपापसातच करत असतात त्यांचा विचार तुम्ही स्वीकारलेला नाही हे लक्षात आले की व्यवहाराची तरा ही वेगळी असते. 

हा व्यवहार नेमका काय असतो आणि त्याचे तत्त्वज्ञान असते का तर हो त्याचे तत्त्वज्ञान असतं हा व्यवहार स्पष्ट आणि स्वच्छपणाने सावरकर यांचा उपयुक्ततावाद आणि व्यवहारवाद यांची सांगड घालत उभा राहत असतो 

सर्वसाधारणपणे हे लोक मोक्ष स्वीकारतात मात्र हा मोक्ष वेदांती असतो हे लोक तुमच्या सर्व देवतांना भेट देतात मात्र त्यांना हे माहीत असते की ही भेट केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून आपण देतोय . साहजिकच जो देव फळतो त्यामागे हे लोक जास्त असतात अपवादात्मक वेळेला श्रद्धात्मक आकलन डेव्हलप होत असते मात्र मनोमन कुठेतरी हे लोक नास्तिकच असतात आणि देवाकडे सुद्धा उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून बघत असतात अनेकदा काही लोक आतून कट्टर नास्तिक असतात आणि सावरकरांनाच मानत असतात पण हे बोलून दाखवत नाहीत जनतेच्या भावनेला ठेस पोचता कामा नये याविषयी हे विलक्षण सजग असतात. साहजिकच जनसामान्यांना याविषयी एक विश्वास निर्माण झालेला असतो हे कधीही तुमच्या पैशाची चोरी करत नाहीत त्यामुळे वागण्यामध्ये एक प्रकारचा विलक्षण प्रामाणिकपणा आहे असे वाटत राहतं मात्र हे आपल्या हक्काचे पैसे कधीही सोडत नाहीत ते कसे वसूल करायचे याविषयी साम दाम दंड भेद हे यांना फार क्लिअर असते फार अपवादात्मक वेळेला समोरच्याची स्थिती खरोखरच देण्यासारखी नाही याची खात्री यांना पटली तर हे तुम्हाला क्षमा करू शकतात क्वचित घडणारी घटनास्थळी विशेषता जर यांच्याजवळ पुरेसा पैसा पोहोचलेला असेल आणि समोरचा आपल्याला या पैशामुळे काहीही बाधा आणणार नाही याची खात्री पटलेली असेल तर हे पैसा सोडून देतात अन्यथा आपल्या हक्काचा पैसा हा वसूल कसा करायचा हे बघत असतात. सर्वसाधारणपणे एक गोष्ट आणखी कॉमन असते ती म्हणजे हे लोक जेव्हा उधारीने पैसे घेतात तेव्हा तो पैसा शक्यतो बुडवत नाहीत त्यामुळेच जनसामान्यांना कायमच या लोकांच्या विषयी एक आदर वाटत राहतो . 

दुसरी गोष्ट व्यवहारामध्ये जेव्हा भावनेचा प्रश्न येतो तेव्हा हे कधीही भावनेला प्राधान्य देत नाहीत हे व्यवहार अत्यंत चोखपणाने करतात त्यामुळेच लता मंगेशकरने नाकारलेली गाणी आशा भोसले व्यवस्थित गाते अनेकदा आशा भोसले चे किंवा लता मंगेशकर चे एखाद्या व्यक्तीशी काही भांडण झाले असेल तर असे कधी होत नाही की एका व्यक्तीचे एका बहिणीचे भांडण झाले म्हणून दुसऱ्या बहिणीने त्या संगीतकाराशी संबंध तोडले याचे कारण स्वतःचे व्यवहारिक संबंध कधीही झाले तरी बळी द्यायचे नाहीत याविषयी हे लोक विलक्षण सजग असतात पैसा जर का आपल्याच घरामध्ये येत असेल तर तो येऊ द्यावा अशी ही भावना असते अनेकदा जर का स्वतःच्या व्यवहारामध्ये उपयुक्तता दिसत असेल तर हे लोक बिनधास्तपणे भावना बाजूला ठेवून आपल्याला मिळालेली असाइनमेंट कम्प्लीट करत असतात यामध्ये अनेकांना असे वाटते की बहिणींचा झगडा होईल भांडण होईल परंतु प्रत्यक्षामध्ये असे काहीही होत नाही व्यवहार चोखपणे पार पाडला जातो म्हणजेच यदाकदाचित एकमेकाशी स्पर्धा आहे हे लक्षात आले तरी ही स्पर्धा ते वैयक्तिक पातळीवर कधीही घेत नाहीत आणि वैयक्तिक भावना घरामध्ये वेगळ्या आणि व्यवहारिक भावना व्यवहारांमध्ये वेगळ्या अशा तऱ्हेचे वर्गीकरण सहजरीत्या केले जाते .

लैंगिक बाबतीत हे लोक अत्यंत स्वच्छ असतात. ब्रह्मचर्य यांना साधायचे असते परंतु जर का ते साधले जात नसेल तर लैंगिकता ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट असे हे लोक समजत असतात आणि त्यामुळेच दोन लोकांचे जे प्रमाण काही लैंगिक पातळीवर चाललेले असते त्यामध्ये हे लोक कधीही डोकावत नाहीत तो त्यांचा आपापसातला व्यवहार आहे आणि आपण कशाला त्यात झक मारा अशा प्रकारची भावना असते त्यामुळे साहजिकच दोन पक्ष जर का संमतीने हे सर्व काही करत असेल तर हे लोक कधीही त्या दोन लोकांना त्रास द्यायला जात नाही . अनेकांना हिंदुत्ववादी संघटनेमध्ये होणारे लैंगिक व्यवहार हा इशू बनवावा लागतो परंतु प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा इशू संघटनेमध्ये अस्तित्वातच नसतो. या अंगाने कधीही संघटना हस्तक्षेप करत नाही त्यांच्या दृष्टीने तो आतला घरातला प्रकार आहे आणि त्यांचा त्यांनी तो बघून घ्यावा अशीच संघटनात्मक भूमिका असते . जर का त्या दोघांचा व्यवहार चव्हाट्यावरच आला तर मात्र अशा लोकांची खूपदा पंचाईत होते . शक्यतो कामवासना हा पब्लिक प्लॅटफॉर्म वरचा व्यवहारच नव्हे याविषयी हे लोक अत्यंत स्पष्ट असतात . याबाबतीचा संघटनात्मक गोंधळ हा अनेकदा इतर संघटनांचा प्रश्न होतो आणि अनेकदा सोयीस्कर रित्या मौन पांघरून हे लोक हे सर्व काही गाडले जाण्याची विसरले जाण्याची तशी वेळ येण्याची वाट बघत व्यवस्थित कल्टी मारतात . कालांतराने हे सर्व डिस्कशन आपोआप विझले जाते .

या लोकांचा कधीही अहिंसा या गोष्टीवर विश्वास नसतो त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे सावरकर आणि नंतर बोस यांच्यामुळे जिंकले गेले आणि यांच्या सशस्त्र वादामुळेच जिंकले गेले याविषयी यांच्या मनामध्ये काडीची ही शंका नसते त्यामुळेच यांच्यातले अनेक जण भगवद्गीते मधील श्रीकृष्णाचे कट्टर समर्थन करतात आणि ते याबाबतीत गांधीजींना कायमच खलनायक मानत असतात . त्यामुळे सर्वसाधारणपणे गोडसे यांनी गांधी यांच्या हत्येबद्दल अनेकदा व्यवस्थित मौन पाळले जाते मात्र खाजगी मध्ये ह्या लोकांना ही हत्या झाली हे बरोबर झाले नाही हे मान्य असू शकते अनेकदा असेही असू शकते ही चुकलेली गोष्ट आहे परंतु यावर सार्वजनिक भूमिका घ्यायची नाही हा सर्व व्यवहार या संदर्भामध्ये नेहमीच उपयुक्तता काय आहे हे पाहून पार पाडला जातो. 

भारतामधील सशस्त्र क्रांतीचा व्यवहार त्या सशस्त्र क्रांतीचा इतिहास त्यामुळेच वारंवार मांडला जातो आणि यामध्ये मग शिवाजी महाराज सुद्धा येतात कारण त्यांनी सशस्त्र प्रतिकार केला आणि शिवाजी महाराज हे हे वैदिक राज्याभिषेक झाल्यामुळे कसे सशस्त्र हिंदूवादी होते अशी भूमिका सातत्याने बिंबवत नेली जाते आणि नंतर मग पहिला बाजीराव प्रमोट केला जातो आणि नंतर कळत नकळत उत्तर पेशवाई प्रमोट केली जाते . मग लोकमान्य टिळक आणि सावरकर येतात आणि मग सुभाष चंद्र बोस येतात आणि नंतर मग हिंदुत्ववादातले काही लोक येतात हा एक क्रोनोलॉजिकल ऑर्डरचा प्रकार असतो आणि तो कायम प्रमोट केला जातो त्यामुळेच शिवाजीचे गुरु कोण या विषयांना शंका नसते आणि त्या अंगाने वारंवार रामदास स्वामी लोकांच्या पुढे आणून त्यांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून बिंबवले जाते इतकेच नव्हे तर अनेकदा भाषणांच्या मध्येच स्वामी समर्थ रामदासांचा जो व्यवहारच होता जो व्यवहारिक उद्देश व उपदेश होता तो वारंवार आणला जातो आणि अनेकदा हे लोक त्या उपदेशाला खुद्द सावरकर कसे फॉलो करत होते तसे फॉलो करतात आणि त्यामुळेच अनेकदा हे लोक यशस्वी सुद्धा झालेले दिसतात हा व्यवहार सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत असतो परंतु त्याचबरोबर व्यवहारात वाकताना नि: शस्त्रवाद स्वीकारणे गरजेचे असेल तर ते स्वीकारले जाते अनेकदा स्वतःच्या जर भयावर माय मात करता आली नाही तर निदान बोली भाषेत कृती करत राहावे ही मर्यादा स्वीकारत हिंसा आणली जाते . हिंसा अतिशय सूक्ष्म असते आणि स्वतःला नाही जमली तर मग निदान सुभाषचंद्र यांना कशी ती जमली ते सांगितले जाते सातत्याने आणि बिंबवले जाते. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या रस भरीत कहाण्या सांगितल्या जातात अनेकदा या कथा सांगताना यांना चेव चढतो तो बघून यांच्या राष्ट्रीय प्रेमाविषयी कोणालाही शंका नसते मात्र जर का वेळ पडली तर हे लोक व्यवस्थित परदेशात जाऊन सेटल होतात आणि तिथे पुन्हा एकदा आपला हा हिंदुत्ववाद अतिशय व्यवस्थितरीत्या प्रमोट केला जातो एकमेकांना मदत सुद्धा केली जाते आणि यांचे अनेकदा आपापसात न सांगता संघ बनत जातात . अनेक लोक असे आहेत जे कळत नकळत अशा वेळेला विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्यासारखे वागत असतात आणि हे वागणे अनेकदा समोरच्या लोकांना लक्षात येत नाही 

या व्यवहारवादाचे एक विलक्षण वैशिष्ट्य असे असते की सावरकर यांनी जी जेनेटिक्स अनुवंशिक अशी गुणांची परंपरा स्वीकृत केलेली असते आणि ही परंपरा ब्राह्मणांच्यात आहे ब्राह्मणांच्यात कळत न कळत एक जन्मदत्त श्रेष्ठत्व आहे आणि हे श्रेष्ठत्व त्यांना त्यांच्या जीन्स मधून मिळालेले आहे अशी एक जी मांडणी आलेली असते ती स्वीकारली जात असते आपल्या श्रेष्ठत्वाबद्दल या लोकांना काडीचीही शंका नसते पण त्याचबरोबर या लोकांना ब्राह्मणे तर लोकांच्या मध्ये अशा प्रकारचे श्रेष्ठत्व असलेले गुण असलेले लोक मान्य असतात आणि ते लोक हे बरोबर हेरत असतात आणि त्यांना जर का सावरकरवाद पटलेला असेल तर मग ते आपलेच मानतात यामुळे होते काय बहुजन समाजातले मंगेशकरांच्या सारखे लोक हे स्वतःला कट्टर सावरकरवादी समजतात आणि त्यांचे प्रमोशन सर्व लेवलला हे लोक करत असतात तिथे मग ब्राह्मण्य आडवे येत नाही अनेकदा तर समाजातले एक्स्ट्रा ऑडिनरी टॅलेंट असेल तर ते त्याला कधीही बाधा आणत नाही उलट त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा सर्व प्रयत्न केला जातो आणि मग ब्राह्मणे तर समाजातला माणूस हळूहळू हिंदुत्ववादी ब्राह्मण बनत जातो आणि एक कर्मनिष्ठ हिंदुत्ववादी ब्राह्मण तयार होत जातो . हे अत्यंत सूक्ष्म रित्या तयार होत असते पण जर का हे लोक बहुजन समाजातले असून फ्लॉप झाले की मग मात्र हे लोक व्यवस्थितरित्या अंग काढून घ्यायला लागतात . त्यामुळेच राधा मंगेशकर यांच्या करिअरला या लोकांचा काडीचाही उपयोग होत नाही आणि बहुजन समाजातल्या लोकांच्या पुढे या विषयी शोक उरतो . 

सर्वसाधारणपणे या लोकांचा व्यवहार देण्याघेण्याच्या बाबतीत फारच विलक्षण असतो याबाबतीत हे कट्टर सावरकरांना फॉलो करत असतात म्हणजे काय तर हे लोक शक्यतो देत नाहीत पण घेताना मात्र हे लोक अजिबात लाजत नाही मग ती गोष्ट अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल किंवा दारू असेल बहुजन समाजातला एक माणूस हे सर्व जर का afford करत असेल तर हे लोक अतिशय गोड बोलत मधुर बोलत आनंदाने मग त्यांना झेपेल एवढीच दारू पीत सर्व व्यवहार चालवत असतात. अनेकदा मग बहुजन समाजातला माणूस गोंधळात पडतो कारण हे लोक या व्यवहारांमध्ये जोपर्यंत समोरचा देत असतो तोपर्यंत विलक्षण गोड असतात मात्र जर का दोन हिंदुत्ववादी सावरकर वादी लोक एकमेकांना भेटत असतील तर मात्र हा व्यवहार अतिशय सांभाळून केलेला व्यवहार असतो आणि ज्याने बोलावले त्याने मग मेहमाननवाजी करावी हे या लोकांना खूप स्पष्ट असते संपूर्ण व्यवहारामध्ये एक विलक्षण काटेकोरपणा आणि विलक्षण शिस्त आपणाला दिसते देताना हात आखडता घेतला जात नाही मात्र विचारपूस करताना एक प्रकारचा काटेकोरपणा तुम्हाला दिसतो . अन्न असो किंवा दारू असो वाया जाता नये याविषयी विलक्षण जागृत असतात मात्र माझा अनुभव असा की कधी ना कधीतरी या लोकांना दारू सिगरेट यासारखी व्यसने सोडायची असतात आणि जवळजवळ नव्वद टक्के लोक आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर दारू सिगरेट यासारखी व्यसने सोडतात आणि जे दहा टक्के सोडत नाहीत त्या माणसाविषयी या लोकांना मग काडीचीही सहानभूती असत नाही त्यांचे हे विलक्षण मर्यादित असलेले आयुष्य बहुजन समाजातल्या लोकांना कायमच आवडत राहते त्यांना त्यांच्यासारखे बनायचे असते आणि मग साहजिकच मी दारू किंवा सिगरेट कशी सोडली याची सुद्धा नंतर एक पेशंकश तयार व्हायला लागते सावरकरांचा जो संयम होता तो विलक्षण रित्या आपल्या आयुष्यात बाणवण्याचा प्रयत्न हे लोक सातत्याने करत असतात . अनेक लोक यशस्वी होतात. तुम्ही जर का बहुजन समाजातले मोकळे ढाकळे असाल तर मग तुम्हाला कधी कधी असे वाटते की ब्राह्मण असणे म्हणजे असेच असते त्यामुळे कधी कधी तुम्ही यावर विलक्षण रित्या टीका करू शकता परंतु आपली टीका फोल आहे अशी खात्रीसुद्धा या लोकांना वाटत असते . मुळातच अशा प्रकारचा संयम आपल्याला सुद्धा साधायला हवा होता असे नेहमी वाटत असल्याने हे लोक विलक्षण टोकाला जाऊन व्यवहार कधीच करत नाही आणि म्हणूनच या लोकांच्या वर आयुष्यात कधीही बहिष्कार टाकला जात नाही उलट आपल्या मुलांना अनेकदा हा व्यवहार सांगितला जातो की कसा हा ब्राह्मण काटेकोर आहे आणि काटकसरी आहे ते बघ आणि आत्मसात कर . संयम आणि काटकसर हा संपूर्ण यजमानगिरीचा एक विलक्षण व्यवहार असतो अपवादात्मक वेळेला मग नंतर अतिथी म्हणून सुद्धा हा व्यवहार पाळला जातो आणि जर का एखादी व्यक्ती यजमानगिरी आणि अतिथीगिरी यांच्यामध्ये जर का संपूर्ण समतोल साधून व्यवहार करत असतील तर मात्र असे लोक शक्यतो वारंवार बहुजन समाजाकडून बोलवले जातात कारण या लोकांच्या मुळे काहीही विलक्षण नुकसान होत नाही आणि हे लोक कंपनीला अतिशय चांगले वाटत राहतात.

हे लोक साधारणपणे आपली स्वतःची प्रायव्हसी कधीही सोडत नाही आणि त्यामुळेच अनेकदा यांच्या घरामध्ये तुम्हाला क्वचितच आमंत्रण मिळते. सर्व व्यवहार शक्यतो हॉटेल किंवा तस्सम गोष्टी मध्ये व्हावे याविषयी हे लोक विलक्षण रित्या जागृत असतात . जोपर्यंत तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण होत नाही तोपर्यंत हे लोक शक्यतो त्यांच्या फॅमिली मध्ये कुटुंबामध्ये हे घेऊन जात नाहीत. पुन्हा अपवाद शक्यतो यांच्यासारखेच जे हिंदुत्ववादी लोक असतात तिथे मात्र अनेकदा एकमेकांबद्दल आधीच विश्वास निर्माण झालेला असतो त्यामुळे मग परस्परांच्या घरी जाणे येणे होत राहते .

या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे असते की एकदा जर का व्यवहार ठरला कि तो व्यवहार हे लोक कधीही सोडत नाहीत यातले बहुतांशी लोक हा व्यवहार चोखपणे पार पडतात त्यामुळेच अनेकदा असे होते की व्यवहाराच्या पातळीवर हा व्यवहार बहुजन समाजातल्या अनेक लोकांना परवडणारा असतो अनेक यशस्वी झालेले बहुजन समाजातील लोक शक्यतो ब्राह्मणांनाच कामावर का ठेवतात याचे कारण या लोकांचा हा चोख व्यवहार असतो हे शक्यतो आपल्या मालकाचे नुकसान होऊ देत नाहीत . किंबहुना जास्तीत जास्त आपल्या मालकाचा फायदा व्हावा म्हणून हे याबाबतीत विलक्षण आणि प्रामाणिक कष्ट करत असतात .राजकीय पातळीवर एकदा का मालकाने आपले धोरण काय आहे ते सांगितले की मग हे धोरण कसे अमलात आणायचे याविषयी हे लोक विलक्षण संवेदनशील असतात आणि आपल्या मालकाचे चांगले आणि वाईट व्यवहार हे व्यवस्थित पार पाडत असतात शक्यतो कथा कादंबऱ्यांच्या मध्ये असलेले अनेक ब्राह्मणांचे वाचले जाणारे धोका दिल्याचे व्यवहार प्रत्यक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत नसतं आणि आजही घडत नाहीत . मात्र तुमचा त्यांच्या व्यवहाराला असलेला उपयुक्ततावाद मात्र प्रत्यक्षात जोपासला जातो आणि त्यामुळेच अनेकदा आपण फक्त वापरले गेलेलो आहोत हे लक्षात येते . मात्र अशा लोकांचे प्रमाण 20% च असेल . कोणीतरी एखादा जो ब्राह्मण असा असतो की जो याबाबतीत पाठीत खंजीर खूपसत असतो त्यामुळे बहुजन समाजातले अनेक यशस्वी झालेले बिझनेस मॅन आणि स्पेशल उंचीवर पोहोचलेले राजकारणी हे ब्राह्मणांना आपल्या ठाई नोकरीमध्ये ठेवतच असतात कारण एक प्रकारची लॉयल्टी मिळण्याची शक्यता असते आणि मुख्य म्हणजे व्यवहारांमध्ये एक विलक्षण सातत्य असतं कथा कादंबऱ्यातले पाठीत खंबीर असणारे व्यवहार प्रत्यक्षामध्ये घडतीलच याची शक्यता फक्त एक टक्का असते मग हे लोक नेमके कधी धोका द्यायला तयार होतात तर जर का तुम्ही त्यांच्या संपूर्ण ब्राह्मणी व्यवहाराबद्दल विलक्षण टीका करायला लागला किंवा त्या ब्राह्मण असण्यालाच चॅलेंज द्यायला लागला की मग यांचा व्यवहार बदलायला लागतो हे डोक्यात ठेवून व्यवस्थित तुमचे जे काय करायचे ते करत राहतात किंवा हळूच गोड बोलून तुमच्याबरोबर असलेला व्यवहार संपवत त्यापेक्षा अधिक संधी देणाऱ्या व्यवहार स्वीकारतात. अनेकदा नकार देताना सुद्धा भाषा अतिशय सभ्य असते . अपवादात्मक वेळेलाच कुणी डिवचला जातो आणि त्याचा नाना फडणवीस होतो अनेकदा तुम्ही घाशीराम कोतवाल सारखे पंडित असला तरी सुद्धा तुम्हाला सोडले जात नाही .

व्यवहार करण्याची विलक्षण तैलबुद्धी हा या संपूर्ण जमातीचा एक विलक्षण विशेष आहे आणि आपल्याला हा विशेष ब्राह्मण असल्यामुळेच किंवा जन्मदत्त व्यवहाराची परंपरा असल्याने प्राप्त झालेला आहे याविषयी या लोकांना शंका नसते .

संपूर्ण भारतामध्येच या लोकांची प्रशासन क्षेत्रामधली उपस्थिती ही लक्षणीय असते आणि अनेकदा हे लोक एकमेकांबरोबर व्यवहार व्यवस्थित ठरवून पार पाडत असतात आणि एकमेकाला प्रमोट करत असतात विशेषतः जर का व्यवहार क्रॉस करत नसेल तर मग ती व्यक्ती विलक्षण रित्या प्रमोट केली जाते कारण आपल्याला त्या व्यक्तीचे काम येणार नाही हे यांना माहिती असते म्हणजे उदाहरणार्थ जर का लता मंगेशकर सारखे आपण गाऊ शकत नाही हे माहिती असेल तर मग हे लोक लता मंगेशकरला जितके प्रमोट करता येईल तितके ते करत राहतात त्यामुळेच या लोकांची करीयरस कायमच बनत असतात यासाठी लागणारे सर्व प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी या लोकांची असते अंदमानमध्ये प्रचंड मेहनत करणारे सावरकर या लोकांना त्यामुळेच कायमच आमंत्रित करत असतात. कष्टांच्यावर ईश्वरापेक्षा जास्त श्रद्धा हा एक विलक्षण गुण लोकांच्या ठाई असतो संधी नेमकी कुठे आहे हे यांना आपोआपच कळत असते आणि ती संधी मिळवण्यासाठी हे विलक्षण मेहनत करतात व्यवस्थित फिल्डिंग लावतात आणि संधी मिळाल्यानंतर शक्यतो आपण त्यामध्ये अपयशी होता कामा नये याचे संस्कारच या लोकांच्यावर झालेले असतात या लोकांचे सर्वाधिक पंचाईत श्रीधर तिळवे नाईक यांच्यासारखे लोक करत असतात कारण यांच्यासारखे लोक व्यवहारच करत नसतात आता व्यवहारच न करता आपल्या पद्धतीने जगणारा ह्या माणसाचे करायचे काय हे यांना कधीही कळत नाही आणि म्हणूनच गांधींच्या सारखे लोक यांच्यापुढे फार मोठा पेचप्रसंग निर्माण करत असतात. एकीकडे मोक्ष या संकल्पनेविषयी आदर असतो आणि दुसरीकडे धार्मिक प्रश्नांच्या बाबतीत धर्माबाबत हा माणूस अडथळा असल्याने हा माणूस प्रमोट होऊ नये कारण तो आपल्या धार्मिक विचारांच्या संदर्भामध्ये आणि विचार प्रणालीच्या संदर्भामध्ये अडथळा आहे याची या लोकांना कल्पना असते मग काय करायचे शक्यतो अशा माणसांना मरण येईपर्यंत वाट बघायची आणि एकदा अशा प्रकारचा माणूस मेला की मग त्याला सामावून घेण्यासाठी आपल्या परंपरेमध्ये काय करता येईल तीच्यात काही बदल करता येईल का? हे आजमावत मग त्याला एक विशिष्ट पद्धतीची प्लेसमेंट द्यायची आणि हा माणूस आपलाच कसा होता हे सांगत राहायचे अशा प्रकारचा व्यवहार पार पाडला जातो . मरणोत्तर तुमचे काय करायचे याविषयी सुद्धा या लोकांना विलक्षण तैलबुद्धी प्राप्त झालेली असते त्यामुळेच मेल्यानंतर सुद्धा या लोकांचे काहीही तुम्ही बिघडवू शकत नाही . त्यामुळे गांधीजींचे खरोखरच मेल्यानंतर किती हिंदुत्ववादी लोकांचे व्यवहारिक पातळीवर नुकसान केले असा जर का प्रश्न आपण विचारला तर त्याचे उत्तर शून्य असे येते . अपवादात्मक वेळेला यांच्यातले अत्यंत कट्टर लोक उदाहरणार्थ श्याम पोंक्षे गांधी हत्येचे सुद्धा समर्थन करत राहतात पण हे करताना ते कधीही स्पष्ट स्वच्छ भूमिका घेत नाहीत पण नथुराम गोडसे यांची भूमिका तात्विक पातळीवर कशी बरोबर होती हे सांगत राहतात .

युरेशियन लोकांच्यातला किलर इस्टिंक्ट या लोकांच्या मध्ये सौम्यपणे वावरत असतो त्यामुळेच त्या वावराचे काय करायचे असा प्रश्न यांच्या विरोधकांना पडत असतो कारण हे थेट कधीही हा किलर इस्टिंक्ट मिरवत नाहीत . मात्र खाजगी मध्ये स्वतःच्या ठायी असलेले भय हे लोक सांगत राहतात.

एकंदरीत आपण संपूर्ण व्यवहार बघितला तर आपणाला असे लक्षात येते की हे लोक ज्यांना स्वतःला उत्तम व्यवहार करायचा असतो आणि यशस्वी व्हायचे असते त्यांच्या चौकटीत व्यवस्थित बसत असल्याने वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आणि सरकार चालवत असतात आणि अनेकदा चालवत असलेल्या अनेक गोष्टींच्या मध्ये हे व्यवस्थित स्वतःची प्लेसमेंट करत स्वतःचे उत्तम करिअर करत असतात. त्यामुळेच अनेकदा लोक व्यवहार प्रिय बनत असतात यांचे संघटन एकमेकाला पूरक मदत करत व्यवस्थित चाललेले असते आणि म्हणूनच यांना हरवणे फार कठीण जात. त्यांना चेहरा असतो मात्र त्यांचे शरीर नेमके कुठे सापडेल याविषयी बहुजन समाजाला कसलीही कल्पना येत नाही . अनेकदा यांची शक्ती अदृश्य असते आणि अनेकदा हे वैदिक पण शक्तीचे उपासक असतात त्यामुळेच बहुजन समाजाला यांचे काय करायचे असा प्रश्न सुद्धा कधीकधी पडत असतो .

आधुनिक आणि उत्तर आधुनिक कालखंडामध्ये व्यवहार कसा चालवायचा व्यवहार वाद कसा चालवायचा हे या लोकांना नीट कळलेले आहे असे वाटत राहते मात्र खरोखरच यांचा व्यवहार दूरगामी पातळीवर भारतासाठी कितपत परवडेबल आहे हे शेवटपर्यंत कळत नाही अजूनही ते कळलेले नाही . त्यामुळेच एक विलक्षण पॉज टाकत माणसे यांच्या विषयी बोलत राहतात . व्यवहारामध्ये यांना प्रमोट करत राहतात परंतु सार्वजनिक जीवनातल्या बोलण्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारचा पॉज टाकला जातो . हा पॉज थोडासा समजून घेण्याचा आणि मोडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख आहे 

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे