शैव श्रुती का आवश्यक आहे
पुन्हा एकदा श्रीधर तिळवे नाईक आनंद मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे शैव वैष्णव आणि धर्मनिरपेक्षतावाद याबद्दलच्या तुमच्या पोस्ट्स वाचताना नेहमी एक प्रश्न मनात येतो की धर्मनिरपेक्ष लोकांनी शैवधर्म स्वीकारावा असं तुमचं मत आहे. पण ज्याप्रमाणे वैष्णव आणि धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी आहेत त्याप्रमाणे शैव स्वतः सत्ताकांक्षी नाहीत का? आपण संपूर्ण भारतभर आपल्या शैवधर्माचा प्रसार करुन संपूर्ण भारत शिवमय करावा अशी आकांक्षा त्यांच्या मनात नाही का? आणि नसेल तर सत्ताविन्मुख होणाऱ्या गटाचा धर्म स्वीकारून धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी वैष्णवांचा मुकाबला कसा काय करु शकतील? सर्वात प्रथम तुम्ही एक जेन्यूइन प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन ! सर्वात पहिली गोष्ट जो खरा वैष्णव असतो तो राम कृष्ण हरीच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही जो शैव असतो तो शून्याच्या मागे लागतो 0 प्राप्तीच्या शून्य अवस्था प्राप्त करण्याच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही तर आता एक टेंडन्सी म्हणून पाहू . सत्तेची आकांक्षा सर्वच माणसांच्यात असते त्यामुळे आपणाला असे म्हणता येत नाही की ती शैव लो...