आशुतोष दिवाण ह्यांनी माझ्या छोट्या लेखावर पुढील कॉमेंट दिलीये Ashutosh Diwan सर, आपल्याइतका अभ्यास व टेक्निकल जार्गन कळत नाही,पण लिखाणाचा जीस्ट समजून घ्यावा. आपण अस्तीत्ववादी/ॲबसर्ड अस्तीत्ववादी या कॅटॅगिरीत जी नावे घालता त्यातील सारंग,रेगे वगैरे ठीक आहे पण नगरकर यांच्याबद्दल काही समजत नाही.रेगे सारंगांचे साहित्य आपल्या जीवनाला सूक्ष्मपणे लागू आहे असे ॲार्गॅनिकली वाटत राहते,तसे नगरकरांचे,विशेषत: इंग्रजी लेखन वाटत नाही.इंटेलेक्च्यूअली ते तंत्र त्यांनी वापरले आहे व आपल्या कसल्याच स्पष्ट अस्पष्ट जिवनानुभवाला किंवा जीवनआकलनाला ते जुळत नाही असे वाटते. तसाच अनुभव मराठीत या दिशेचे कवि,”अरुण कोलटकरची कविता”नंतरचे कोलटकर आणि चंप्र आणि लाखे यांच्याबद्दल जास्त येतो.बळवंतबुवाच्या कविता काय,द्रोण काय हे तत्कालीन वाटत राहते.चंप्रंचे एकवेळ ठीक आहे पण आजचे मान्यताप्राप्त महत्वाचे कवी लाखे यांची ॲबसर्डीटी इतकी इनकोहेरंट असते की ती परपझलेस वाटते.अगदी वेटींग फाॅर गोदो सुद्धा माझ्या आयुष्याला लागू आहे हे मला कळते तसे या कविंचे होत नाही.वाचकाला कसलेच भान न देणारी चमत्क”कृती”चांगली महत्वाची कशी म्हणायच...