Posts

Showing posts from July, 2025
 अलीकडे तर अवस्था अशी आहे की बौद्ध वेबसाईटवर काही लोक स्पष्टपणे सिद्धार्थ हे नाव सुद्धा ब्राह्मण लोकांनी दिलेले आहे त्याचे मूळ नाव सुख किती होते असा प्रचार करत आहेत याचे कारण स्पष्ट आहे सिद्धार्थ ह्या नावामध्ये सिद्ध असल्याने आता हे नाव अडचणीचे भासत आहे अशोकाचे नाव अशोक होते हे बरोबर आहे पण बुद्धाच्या नावाबाबतचा सिद्धांत बरोबर आहे असा वाटत नाही  श्रीधर तिळवे नाईक

निर्वाण सिरीज

 Concerns कोणालाच असत नाही  तोही प्रोफेशनल झालाय  आणि त्यासाठी तुला इस्पितळात ऍडमिट व्हावे लागेल  संन्यास स्वीकारलास तेव्हाच  समाजमान्य एकटेपण स्वीकारलेस  स्वीकारलेस की जगण्याची टिकण्याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे  रोग समाजाकडून आला की निसर्गाकडून आला  हा मुद्दा नाही  मुद्दा हा आहे की मरणाला टेकून तू समोरच्या माणसाला करुणेच्या नजरेने बघू शकतो का?  डॉक्टरला द्यायला तुझ्याजवळ पैसे नाहीत  त्यामुळे तोही मुद्दा नाही  हे जे अंगात आणि अंगावर पसरलेले आहे  ते तू कसे काढणार हा मुद्दा आहे मोक्ष मिळाला नाही  पण मरणाची गॅरंटी आहे अशी ही सिच्युएशन  पंक्चुएशन्स करण्याआधीच पूर्णविराम समोर   त्वचा पूर्ण ठासली गेलेली  आणि ठेच जागोजागी  मोडकळीला आलेले शरीर घेऊन  तुला या शहरात टिकायचे आहे  एकट्याने  घाबरून जाऊ नकोस  एकटेपणा आजार आणि तू  हे डेडली कॉम्बिनेशन नाही का ? आजाराला सुद्धा एंटरटेनमेंट म्हणून पाहता आले पाहिजे  इंटरवल तर आली  निदान दि एंड पर्यंत कर्मणूक सेलिब्रेट कर ...

चॅनेल बॉलीवूड

 त्या त्या चित्रपटा पुरतीच दोस्ती  नंतर कोण लक्षात ठेवतो ही मस्ती  सगळे संबंध तात्कालीक असतात  आत्ताच फोटो काढ नंतर कुठे असणार हस्ती  कुठलाही फायनान्स पर्मनंट नाही सगळ्या तिजोऱ्या तात्कालीक तात्कालीक गस्ती  नंतर कुठे पुन्हा इथे यायचे आहे  हे लोकेशन आहे ना घर आहे ना वस्ती  मोबाईलवर देवघेव तर चालेलच  जोवर एकमेकाला गरजेची धास्ती  फिल्म फ्लॉप झाली तर भेटू नको  त्या बिल्डिंगमध्ये राहू नये जी आहे खचती  श्रीधर तिळवे नाईक  (चॅनेल सिरीज मधील चॅनेल बॉलीवूड या काव्यफायलीतून)

लव लवर अँड टेरर

 मंजिलपे कुछ नही बस शिव है शून्य है  शरीर तो शक्ती का एक्सपेरिमेंट है  यहाँ कोई कामयाबी नही चलती  शुरू से अंत तक सफरही सफर है  अल्ला तो शिव का बस एक सगुण रूप  सेकडो पहचानोमेंसे वो एक पहचान है  आर्टिफिशियल हैं अपने मजहब पे गरूर इसे अच्छी तरीकेसे समझना इंटेलिजन्स हैं  एक किताबमें कभी दुनिया समाई होती है क्या? जो एक किताबमे समाये वो ना अल्ला ना ईश्वर हैं  तुने परवरदिगार को भी छोटा कर दिया  और इसके पीछे तेरा छोटा कद है  तू सोचेगा नही कितना भी मै कहू  क्यूँ की तेरे सोचपे मजहबका लॉक है आपने इस बेवकूफीमें एक दिन तू मरेगा जरूर  मुझे अभी सी दिखती तेरी सडी हुई लाश है  गम ये नही की तू मरेगा गम ये है की  तेरे लाशके साथ दिखती मानव संस्कृतीकीभी लाश हैं  कई बार अंदरके जानवर ने अंदरका इन्सान खतम किया ये मेरी बदनसीबी है की यही इतिहास हैं  जिस  इतिहास से कोई सिकता नई ऐसा ये इतिहास हैं  (चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव , लवर अँड टेरर या काव्यफायलीतून)
 महात्मा गांधी आणि हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक  शैव धर्माची साधी दखलसुद्धा न घेणारे महात्मा गांधी शैवांच्या इतिहासात स्थान मिळवू शकले नसले तरी भारतीय इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे  वैष्णव धर्मात पाच टप्पे आहेत  १ श्रुतिस्मृतिमहाकाव्यपुराणोक्त वैष्णव धर्म हा वेद , स्मृती आणि वर्णजातिव्यवस्था प्रमाण मानतो गांधीजी सुरवातीला ह्या टप्प्यात होते  २ भक्तिवेदांत : शंकराचार्यांचा वेदांत आत्मसात करून त्यांचे ब्राह्मणीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम रामानुजाचार्यांनी केला आजही भक्ती वेदांताची चळवळ जोरात आहे हीही वर्णजात मानते ह्यानेच तामिळ वैष्णव भक्ती सिद्धांताचा भारतभर प्रचार केला वारकरी पंथावर नाथ आणि भक्तिवेदांत ह्यांचा समान प्रभाव आहे  ३ गीताधर्म : हा तिसरा टप्पा श्रीकृष्णालाच प्रमाण मानतो व गीतेला धर्मग्रंथ ! भारतातील रानडे , टिळक , गोखले , गांधी ह्या सर्वांच्यावरच ह्याचा प्रभाव पडला आहे गांधींच्या आयुष्यातील तिसरा टप्पा गीताधर्माचा आहे  ४ नववैष्णव : ह्याची सुरवात चक्रधरांनी केली हा कृष्ण व राम ह्यांना प्रमाण मानतो मात्र वर्णजातिव्यवस्था मानत नाही गांधीजी...
मार आणि हर श्रीधर तिळवे नाईक  महाराष्ट्रामध्ये फार प्राचीन काळापासून दोन सर्व समाज अस्तित्वात आहे आणि हे दोन्हीही लढवय्यांचे समाज आहेत  पहिला मार आणि दुसरा हर यातील मार या शब्दाचा अर्थच नेतृत्व करणारा असा आहे हा एक सतत युद्धाला तयार असलेला समाज होता तो शांत होता आणि तुळजाभवानी ही त्याची कुलदेवता होती तर खंडोबा हे त्याचे कुलदैवत होते ह्यात प्रामुख्याने कुणबी म्हणजे शेती करणारे लोक येतात त्याचबरोबर पंडित लोक सुद्धा यामध्ये येतात जे पुढे ब्राह्मण झाले पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातील 99% ब्राह्मण हे मूळचे पंडितच आहे आणि या लोकांनी आता पुन्हा पंडित व्हावे हे बरे हेच लोक मार म्हणून बौद्ध वाङ्मयात अनेकदा येतात कारण ते संपूर्ण भारतभर पसरलेले होते मारणे मारामारी करणे वगैरे सर्व क्रियापदे आणि नामे ही या मार शब्दापासूनच तयार झालेली आहेत साधारणपणे इसवी सन दुसऱ्या शतकाच्या आसपास उत्तरेकडून इरेशन ब्राह्मण भगत लोक आले आणि त्यांनी महाराष्ट्र बिघडवायला सुरुवात केली. मात्र त्यांना यश मिळायला तब्बल सात शतके जायला लागली पण आश्चर्यकारक इथे आहे लोक चिकाटीने हा समाज कसा फोडता येईल याची वाट पाहत रा...

मोक्ष आफ्टर इफेक्ट

 रियल इंटीलिजन्स घट  आर्टिफिशीयल इंटीलिजन्स वाढ  आता सूजेला मी माझा अवयव मानावं काय  एक्स्टेंडेडचा तमाशा आयुष्याचा फोकस ? जे फ्रिक ते किक  माझ्या डोळ्यांच्यावर मायेचा ताण  मी आता माझी बुबुळं भाड्याने द्यावीत काय ? रक्तात वाळवत ठेवलेले स्फटिक  वाळवंटाची तयारी करतायत काय ? आसक्त्यांचा अंत नाही  संत आर्टिफिशियल  इंटरनेट साधन म्हणता म्हणता जगणं बनलंय  अन जगन अजूनही कमळ बघतोय  माहितींचे अदृश्य डोंगर उचलतांना मी XXमान  राXला सन्मान दिला तर  XX म्हणतोय  छाती फोडून फोटो दाखव  नाहीतर आर्टिफिशीयल इंटीलिजन्सचा फायदा काय ? मेलो ह्याचं दुःख नाही  छाती भलत्याच ठिकाणी उमटली  ह्याचं दुःख आहे    श्रीधर तिळवे नाईक  (मोक्ष सीरीजमधील आफ्टरइफेक्ट ह्या काव्यफाईलीतून )

बाळबोध कविता

तू जाशील पण परतणार नाही फुले मरतील बाग गाणार नाही  तू ज्या धर्माकडे जाते आहेस  तो धर्म कधीही सुधारणार नाही  मर्त्यतेवर कोणी मात केली  या मातीत कोण मिळणार नाही? जो तो दुसऱ्याला हुकूम देतो  कोणाचाच हुकूम चालणार नाही  या सगळ्या गोंधळापेक्षा प्रेम बरे  प्रेमाशिवाय जगास काही बरे करणार नाही  श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) तू म्हणालीस म्हणून घराबाहेर पडलो निमूटपणे  माहित होते विषारी तरी फळास लगडलो निमूटपणे बोलू सुद्धा दिले नाहीस ओठ माझे केलेस लॉक  एकटाच एकांतात स्वप्नात बडबडलो निमूटपणे गाडीमध्ये रात्री काढल्या दिवस काढले सूर्याखाली  उन्हात कधी काळोखात मी तडफडलो निमुटपणे  दिली नाहीस कधी बेछूट वागण्याची तू किंमत  तुला आली फुले आणि मी झळझडलो निमुटपणे   रस्त्यावरती हिंडतो आहे मी आता बेहोशी मध्ये आठवत नाही कुठल्या जिन्यावरून गडगडलो निमुटपणे इतकेच आहे आठवते की तुला दोन डोळे होते  आणि तुझ्या नाकासमोर मी चडफडलो निमुटपणे श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) पता नही क्या मगर कुछ ल...

Channel series

  साक्षात्कार श्रीधर तिळवे नाईक  १ तू निघून जाणार नाहीस  दुसरे निमंत्रण म्हणून पुन्हा पुन्हा उगवशील समोर नसताना समोरच्याविषयी बोलणे  याची भाषेलाही आता सवय आहे  तिच्या मांसाला एकनिष्ठता ठाऊक नाही  आणि हाडांना तर  अनेक चेहरे कॅल्शियम म्हणून लागतात  ज्या मुली स्वतःलाच बिघडवून घेण्यात हुशार असतात  त्यांच्या इतिहासाची चौकशी करू नये  तुझ्या जीभेतच तुझे उद्देश होते  आणि तुझ्यापासून सावध करण्याचे उपदेश  गटांगळ्या खातच गटारांना मिळाले  हे असं होतं  व्यभिचार सशासारखा उड्या मारत जातो  झोपतो  आणि पश्चाताप  कासवासारखा मागे राहत शर्यत जिंकतो जी जिंकणे निरर्थक असते  २ माझं प्रेम होतं  प्रश्न ते एकतर्फी होतं  की तिच्या बाजूनेही होतं  हा प्रश्न तुझ्यामुळे उपस्थित  नाहीतर मी निश्चितच होतो  सगळं दुतर्फा म्हणून  आकाश एकच होतं  पण चांदणं तीन ढगांच्या वर पडलं  पृथ्वी एकच होती  पण जमीन तीन वहिवाटदारांच्या कडे गेली  आता विनंती केली म्हणून  तिला पश्चाताप झाला असं समजाव...

नरेंद्र मोदी

 मोदींचा राजकीय शेवट जवळ आला आहे का? श्रीधर तिळवे नाईक  ब्राह्मणवाद हा मूलतः भगतवादाचा वैदिक अविष्कार आहे .सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म स्वीकारून वैदिक श्रद्धेने वैदिक धर्म तयार केल्यानंतर तो मोक्षाकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर ब्राह्मण भगत वर्गाने मोक्ष स्वीकारला पण सर्व वैदिक कर्मकांडे जशीच्या तशी राहतील याची पूर्ण काळजी घेतली अर्थात तरीही जेव्हा क्षत्रियांनी ब्राह्मणांना प्रभुत्व दिले नाही तेव्हा मात्र ब्राह्मणांना बंड करण्या खेरीज काहीही पर्याय राहिला नाही आणि ब्राह्मण धर्म हा ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान अबाधित राखण्यासाठीच निर्माण झाला जे वैदिक क्षत्रिय होते त्यांना पद्धतशीरपणे हटवले गेले त्यातूनच परशुरामाची दंतकथा निर्माण करण्यात आली क्षत्रिय हे फक्त वैदिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे क्षत्रियांचा नाश म्हणजे योध्यांचा नाश नव्हे फक्त वैदिक धर्मात असणाऱ्या योद्धांचा अस्त म्हणजे परशुराम अवतार होय प्रत्यक्षामध्ये हे क्षत्रिय कसे नाहीसे झाले याबद्दल अनेक प्रश्न आहेत त्यावर वेगळी चर्चा केलेलीच आहे  ब्राह्मण धर्माने आणि ब्राह्मण वर्णाने स्वतःची एक स्ट्रॅटेजी डिझाईन...
 गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश साडेचारशे वर्षे पोर्तुगीज वसाहत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय लष्कराकरवी `ऑपरेशन विजय' ही कारवाई करून १९ डिसेंबर १९६१ रोजी हा प्रदेश भारतीय संघराज्याचा भाग बनवला.  या छोट्याशा प्रदेशातील अनेक लोकांनी मागील तीनशे चारशे वर्षांच्या काळात पोर्तुगालला किंवा पोर्तुगीजांच्या वसाहती असलेल्या मोझांबिक, टांझानिया वगैरे ठिकाणी स्थलांतर केले होते. सध्या पोर्तुगालचे पंतप्रधान असलेल्या अंतोनियो कोस्टा यांच्या आजोबांनीही असेच गोव्यातल्या मडगाव येथून मोझाम्बिक येथे स्थलांतर केले होते. गोवा, दमण आणि दीव या पोर्तुगीज वसाहतीतील लोकांना पोर्तुगालच्या नागरिकांनाप्रमाणे नागरी हक्क होते आणि पोर्तुगीज पासपोर्ट असायचा.   गोवा, दमण आणि दीव भारताचा भाग बनला तेव्हा या प्रदेशातून पोर्तुगालला किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतीत राहायला गेलेल्या बहुतेक लोकांनी स्वतःचा पोर्तुगीज नागरिकाचा पासपोर्ट कायम ठेवणे म्हणजेच पोर्तुगालचे नागरिक म्हणून राहणे अधिक पसंत केले,  त्यानंतर ते गोव्यात आणि भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले ते परदेशी ना...

निर्वाण सिरीज २५

 तू आत्महत्या का करत नाही श्रीधर  वायरी जुळत नाहीयेत  आणि नेटवर्क्स तुझ्यासाठी नामधारी आहेत  मारलेल्या उड्या मातीला मिळाल्या  चढाया चढल्याच नाहीत  उलट पर्वत घेऊन आपटल्या  तुझ्या वैचारिक रिक्षांपेक्षा आसपासचे गवत नेहमीच उंच राहिले  व्याकुळतेचे वटवृक्ष धुळीस मिळाले तुझ्या अंतकरणातले  स्फोटसुद्धा केले नाहीत त्यांनी  चुपचाप आवाज न करता मेले  स्वातंत्र्याच्या वाढीचा सुरुवातीचा अगम्य वेग  स्वतःच्याच पानांच्या वर पॉलिश करत राहिला  नैतिकतेचे सोने  सजवलेले अलंकार बनत गेले आणि शेवटी शब्दांचे अलंकार त्यांना गिळून गेले  द्वादशशिलता फक्त पाळलेल्या पशुंच्या इतकीच क्वालिटी देत राहिली  ज्वालामुखींच्या देवता सिगरेट शिलगावत शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात पोहोचल्या  काड्यापेटीत वाकलेली लहान मुले  बालपण गमावत बॅडलक म्हणत राहिली तुझ्या अंगणात तू लहान मुलासारखा आहेस म्हणत  बायका पहात राहिल्या सोप ऑपेरे  रिसेंट फ्लो कुठला आणि अँनशंट फ्लो कुठला हे सुद्धा कळणे मुश्किल होऊन बसले ॲक्शन फ्लोला  आणि शेवटी कळाले की फ...